Godavari River
sakal
चांदोरी: गोदावरी नदीत वाढत्या प्रदूषणामुळे जलचरांचा मृत्यू तर सुरूच आहे, पण याचा थेट फटका आता माणसांच्या आरोग्यावरही बसत आहे. परिसरात पाण्याचा रंग बदलून त्याला दुर्गंधी सुटली, आणि हेच पाणी उपसा करून वापरणाऱ्या शेतकऱ्यांना गंभीर समस्या उद्भवल्या आहेत.