Accident
sakal
चांदवड: मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील राहूड घाटात भारत पेट्रोलियम कंपनीचा एलपीजी गॅस वाहतूक करणारा टँकर पलटी होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात टँकरचालकाचा जागीच मृत्यू झाला असून, गॅसगळती सुरू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेनंतर चांदवड-उमराणे महामार्ग तब्बल २० तासांहून अधिक काळ बंद ठेवावा लागला.