North Maharashtra winter
sakal
नाशिक: कडाक्याच्या थंडीने नाशिककर अक्षरशः गारठले आहेत. सायंकाळनंतर शीतलहरींमुळे अंगाला बोचणाऱ्या थंडीचा अनुभव नागरिकांना येतो आहे. उत्तरेकडून वाहणाऱ्या शीतलहरींमुळे तापमानात घसरण सुरू आहे. शनिवारी (ता. २०) किमान तापमानाने नीचांकाचा नवा स्तर गाठला. निफाडचे तापमान ४.५ अंशांवर, नाशिकचे ६.९, मालेगावचे ७.८, तर जळगाव जिल्ह्याचे किमान तापमान ६ अंश नोंदविले.