Congress Protests
sakal
नाशिक: स्वातंत्र्यानंतर देशात झालेला सर्वांत मोठा भ्रष्टाचार म्हणजे मतचोरी आहे. भाजपने सत्तेचा वापर करून निवडणूक आयोगाला आपले बाहुले बनवले आहे. निवडणूक आयोगाच्या माध्यमातून सत्ताधारी या देशातील कोट्यवधी लोकांची मते चोरण्याचे काम करत आहेत. यामुळे लोकशाही संकटात आली असून, आता जनतेने रस्त्यावर उतरून राहुल गांधी यांच्या लढ्याला साथ देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव आणि शहराचे प्रभारी ब्रिजकिशोर दत्त यांनी आज केले.