Agricultural News : आवर्तन लांबल्याने रब्बी पिकांना फटका

शेकडो हेक्टरवरील पिके जळाली ; पालखेड प्रशासनाने भरपाई द्यावी, शेतकरी संघटनेची पंचनाम्याची मागणी
Agricultural News
Agricultural Newssakal
Updated on

येवला- अवर्षणप्रवण असलेल्या येवल्यात पावसाच्या पाण्यावर आठमाही हंगाम साधला जातो. मात्र, रब्बीसह उन्हाळी पिकांसाठी पालखेड डाव्या कालव्याचे दोन आवर्तनेच लाखमोलाचे असतात. पण, यंदा पालखेड डावा कालवा प्रशासनाने सुमारे १५ दिवस उशिरा आवर्तन सोडल्याने लाभक्षेत्रातील शेकडो हेक्टरवरील पिके करपली आहेत. नियोजनाच्या अभावाचा हा फटका असून, शासकीय दिरंगाईने शेतकऱ्यांना फटका बसला. पालखेड प्रशासनाने या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com