Democracy Day
sakal
नाशिक: ‘शासकीय काम अन् सहा महिने थांब’, असे नेहमीच बोलले जाते. पण, शासकीय पातळीवर याच विचाराला छेद देण्याचे कार्य लोकशाही दिनाच्या माध्यमातून केले जात आहे. यंदा विविध लोकशाही दिनातून ७२ तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे दाखल आहेत. यातील ३९ तक्रारी सोडविण्यात आल्या आहेत. प्राप्त तक्रारींचा तत्काळ निपटारा करून सामान्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.