

Road Work Lapse Behind Fatal Mishap
Esakal
सकाळ वृत्तसेवा, वणी, ता. ५ : रस्ता म्हणजे प्रगतीचा मार्ग मानला जातो; मात्र दिंडोरी तालुक्यातील शिवाजीनगर भागात हाच रस्ता मृत्यूचा सापळा ठरला. रस्त्यालगत असलेल्या उघड्या विहिरीत वाहन कोसळून एकाच कुटुंबातील नऊ निष्पाप जीवांचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेनंतर प्रशासनाने काही तासांत विहीर बुजवून आपले ‘कर्तव्य’ पार पाडल्याचा दिखावा केला; मात्र हा प्रश्न अनुत्तरितच राहतो हेच काम आधी का झाले नाही? ही घटना नैसर्गिक नसून सरळसरळ प्रशासकीय निष्काळजीपणाचा परिणाम असल्याचे स्पष्ट होत आहे. Dindori tragedy raises questions on safety as well boundary got buried during construction