नाशिक: महाराष्ट्रात गेल्यावर्षी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत मतांची चोरी झाली आहे. या मतचोरीमुळे लागलेले निकाल महायुतीसाठी सुद्धा धक्कादायक असल्याची टीका शिवसेना (उबाठा) युवा सेनेचे सचिव, आमदार वरुण सरदेसाई यांनी केली आहे. मंत्र्यांच्या वर्तनावरपण जनतेमध्ये रोष आहे. त्यामुळे आता जनता विरोधी पक्षाकडे आशेने पाहत असल्याचे ते म्हणाले.