Leopard
sakal
नाशिक: जिल्ह्यात बिबट्यांची वाढती संख्या आणि मानवी वसाहतीलगत वाढत चाललेला त्यांचा वावर लक्षात घेता, मानव व वन्यजीव यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी एकात्मिक कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. या आराखड्याअंतर्गत संपूर्ण जिल्ह्याचे उच्च धोका क्षेत्र व मध्यम धोका क्षेत्र असे वैज्ञानिक पद्धतीने वर्गीकरण करण्यात येणार असून, त्यानुसार ठोस उपाययोजना राबविल्या जाणार आहेत.