Nashik News : दररोज ८ शेतकऱ्यांचा मृत्यू! भीषण वास्तव रोखण्यासाठी कृषी आयुक्तांकडून 'टास्क फोर्स'ची घोषणा

Maharashtra Forms Special Task Force to Prevent Farmer Self-destruction : राज्यात सातत्याने होणाऱ्या शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर, कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी विशेष कृतिदलाची घोषणा केली. हे दल शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्यासह त्यांच्या आर्थिक आणि तांत्रिक सक्षमीकरणासाठी काम करेल.
Farmer Self-destruction

Farmer Self-destruction

sakal 

Updated on

नामपूर (जि. नाशिक): शेतमालाला मिळणारा अत्यल्प बाजारभाव, कर्जबाजारीपणा, नापिकी, बाजार समित्यांतील लूट, रासायनिक खतांच्या वाढत्या किमती, तसेच अस्मानी-सुलतानी संकटांच्या मालिकेमुळे राज्यातील शेतकरी गंभीर आर्थिक व मानसिक दडपणाखाली आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात रोज सरासरी ७ ते ८ शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. गेल्या चार दशकांपासून लागलेला हा कलंक अद्याप पुसला गेलेला नसल्याने कृषी विभागाने शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी विशेष कृतिदल (टास्क फोर्स) स्थापण्याचा निर्णय घेतला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com