Farmer Self-destruction
sakal
नामपूर (जि. नाशिक): शेतमालाला मिळणारा अत्यल्प बाजारभाव, कर्जबाजारीपणा, नापिकी, बाजार समित्यांतील लूट, रासायनिक खतांच्या वाढत्या किमती, तसेच अस्मानी-सुलतानी संकटांच्या मालिकेमुळे राज्यातील शेतकरी गंभीर आर्थिक व मानसिक दडपणाखाली आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात रोज सरासरी ७ ते ८ शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. गेल्या चार दशकांपासून लागलेला हा कलंक अद्याप पुसला गेलेला नसल्याने कृषी विभागाने शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी विशेष कृतिदल (टास्क फोर्स) स्थापण्याचा निर्णय घेतला आहे.