Farmers Protest
sakal
नाशिक: नाशिकहून मुंबईच्या दिशेने झेपावलेले अखिल भारतीय किसान सभेचे ‘लाल वादळ’ बुधवारी (ता. २८) शमण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मंगळवारी मंत्रालयात झालेल्या निर्णायक बैठकीत सरकारने संघटनेच्या सर्व प्रमुख मागण्यांवर अंमलबजावणीची संपूर्ण हमी दिल्याने आंदोलन निर्णायक टप्प्यावर पोहोचले आहे. मात्र, अंतिम निर्णय थेट रस्त्यावर थांबलेल्या आंदोलकांशी चर्चा करूनच घेतला जाईल, अशी ठाम भूमिका किसान सभेच्या नेतृत्वाने स्पष्ट केली आहे.