नाशिक- नाशिक जिल्हा बॅंकेकडून सुरू असलेली सक्तीची कर्जवसुली बंद करून शेतकऱ्यांना व्याजमाफी करण्याची मागणी नाशिक जिल्हा शेतकरी संघटनेने केली आहे. शेतकऱ्यांकडून फक्त मुद्दल घ्यावी, यासाठी लवकरच विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना भेटण्याचा निर्णय रविवारच्या (ता.१५) बैठकीत घेण्यात आला.