पंचवटी: नाशिकमध्ये मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला आहे. यामुळे गोदावरी नदीची पातळी वाढली. पाण्याच्या प्रवाहामुळे रामतीर्थ वाहनतळावर उभ्या असलेल्या गुजरातच्या आमदारांच्या गाड्या आणि इतर दुचाकी अडकल्या होत्या, ज्यांना अग्निशमन दलाने सुरक्षित स्थळी हलविले.