Fruit Market
sakal
नाशिक: द्राक्षाचा हंगाम सुरू होताच बाजारपेठेत रंगत आली असून, फळांच्या दरांबरोबरच ऋतुबदलाची चाहूलही ठळकपणे जाणवू लागली आहे. थंडीची हळूहळू माघार, वाढता उष्मा आणि बदलते हवामान याचा थेट परिणाम फळबाजारावर दिसून येत आहे. सध्या काळ्या द्राक्षांनी बाजारात आघाडी घेतली असून, त्यांना प्रतिकिलो सुमारे २०० रुपयांचा भाव मिळत आहे. साध्या हिरव्या द्राक्षांनाही मागणी असून, ती १५० रुपये किलोने विकली जात आहेत.