Girish Mahajan : "गोदावरीचं पाणी तीर्थ म्हणून पिता येईल इतकं स्वच्छ करणार!"- गिरीश महाजन यांचा निर्धार

Godavari River Cleanup for Kumbh Mela : नाशिकमधील विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना कुंभमेळामंत्री गिरीश महाजन; त्यांनी गोदावरी नदीला प्रदूषणातून मुक्त करण्यासाठी १५०० कोटींच्या प्रकल्पाची घोषणा केली.
Girish Mahajan

Girish Mahajan

sakal 

Updated on

नाशिक: गोदावरी नदीची आपण पूजा करतो, गोदामाईला आई समान मानतो. मात्र कुंभमेळ्यात गोदेचे पाणी तीर्थ म्हणून कुणी पिणार नाही, कारण गोदावरी प्रदूषित आहे, ही वस्तुस्थिती म्हणूनच गोदावरीला पवित्र बनवायचे आहे. त्यासाठी कितीही पैसे लागले तरी चालेल अशी सरकारची भुमिका आहे. त्यामुळेच मलनिस्सारण प्रकल्प उभारला जात आहे. नाशिककरांनी स्वच्छ गोदावरीसाठी सहकार्य करावे, शहराची बदनामी होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन कुंभमेळा मंत्री गिरीष महाजन यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com