Grapes
sakal
नाशिक
Nashik Grapes Crisis : द्राक्ष उद्योगाला 'नव्या वाणां'ची गरज; पेटंटेड व्हरायटींच्या किचकट अटी शिथिल करण्याची उत्पादकांची जोरदार मागणी
Climate Challenges Impacting Nashik’s Grape Industry : अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाच्या संकटाचा सामना करण्यासाठी नाशिकमधील द्राक्ष उत्पादकांनी आता रोगप्रतिकारक, उच्च उत्पादनक्षम आणि निर्यातक्षम नवीन पेटंटेड द्राक्ष वाणांची (जसे की आरा-३५, क्रिमसन, ॲलिसन) लागवड करण्यावर भर दिला आहे, परंतु त्यासाठीच्या किचकट अटी शिथिल करण्याची मागणी होत आहे.
नाशिक: गेल्या काही वर्षांपासून अस्मानी-सुलतानी संकटांनी द्राक्ष उद्योग अक्षरशः कोलमडून टाकला आहे. अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, रोगराई आणि निसर्गाच्या अनिश्चिततेमुळे द्राक्ष उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. परिणामी, यापुढील काळात पारंपरिक द्राक्ष वाणांवर अवलंबून राहण्याऐवजी नवनवीन, अधिक सक्षम आणि बाजारपेठेत मागणी असलेल्या वाणांची लागवड करणे गरजेचे ठरत आहे.
