Grapes
sakal
नाशिक: नाशिक जिल्ह्यात द्राक्षबागा आधुनिकतेकडे वेगाने वाटचाल करीत आहेत. नवीन तंत्रज्ञान, प्रगत व्हरायटी आणि बदलते हवामान या तिन्हींच्या संगमामुळे द्राक्षशेतीचा चेहरामोहरा बदलत आहे. मात्र, या संपूर्ण प्रक्रियेचा पाया असलेल्या जमिनीच्या पोतातील सातत्य आणि गुणवत्ता हा सर्वांत महत्त्वाचा मुद्दा ठरत आहे. शेतकरी आणि कृषितज्ज्ञ यांचा ठाम आग्रह आहे, की बदलत्या कृषी पद्धतींमध्ये जमिनीच्या घटकांचा अभ्यास करून त्यावर दीर्घकालीन, शाश्वत उपाययोजना राबविणे अत्यावश्यक आहे.