Nashik Monsoon : ५० हजारांची मदत द्या! 'या' संकटाने उरलीसुरली आशाही संपली; परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू

Crop and Property Damage Due to Torrential Rain: नाशिक, चाळीसगावसह उत्तर महाराष्ट्रात परतीच्या अतिवृष्टीने शेतांमध्ये पाणी साचले असून, काढणीला आलेल्या खरिपाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले.
Monsoon

Monsoon

sakal 

Updated on

नाशिक: उत्तर महाराष्ट्रात २० तासांत झालेल्या अतिवृष्टीसदृश मुसळधार पावसाने खरिपाची दाणादाण उडाली आहे. मका, ज्वारी, कपाशी, केळी, कांदा, सोयाबीनसह भाताची मोठ्या प्रमाणात हानी झाल्याने शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले आहेत. बहुतांश पिके काढणीला आलेली असताना आलेल्या या संकटाने उरलीसुरली आशाही संपल्याने ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना तातडीची एकरी ५० हजारांची मदत जाहीर करा, अशी एकमुखी मागणी करण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com