मालेगाव परिसरात वादळी पाऊस; शाळांची पत्रे उडाली

वादळी पावसामुळे कळवाडी गटात कांदाचाळ, घरांचे, शाळा यांचे मोठे नुकसान झाले. घरे व शाळांची पत्रे उडाली.
Monsoon debris
Monsoon debrisesakal

मालेगाव (जि. नाशिक) : शहर व परिसरात गुरुवारी (ता. ९) सायंकाळी वादळीवाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. मॉन्सुनपुर्व कामांसाठी दिवसेंदिवस वीजपुरवठा खंडीत करुनही पहिल्याच पावसात शहर व तालुक्यातील बत्ती साडेतीन तासाहून अधिक काळ बंद होती. खंडीत वीज पुरवठ्यामुळे नागरिकांच्या अडचणीत भर पडली. वादळी पावसामुळे कळवाडी गटात कांदाचाळ, घरांचे, शाळा यांचे मोठे नुकसान झाले. घरे व शाळांची पत्रे उडाली.

वादळी वारा व पावसामुळे कळवाडी, नरडाणे, साकुर या गावांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. कळवाडी येथील प्रशांत नगर येथे वीजपोल व तारा पडल्या. या भागातही वीज पुरवठा विस्कळीत झाला. नरडाणे येथील शेवगा पिकांचे अतोनात नुकसान झाले. येथील शाळेचे पत्रे उडाल्याने मोठे नुकसान झाले. राहुल सरावत यांच्या पोल्ट्री शेडचेही पत्रे उडाले. आदिवासी वस्तीवरील झाडे उन्मळून पडली. घरांचे पत्रे उडून नुकसान झाले. याबाबत माहिती मिळताच आमदार सुहास कांदे यांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना सूचना करत पुरवठा सुरळीत करण्याचे आवाहन केले. श्री. कांदे यांचे स्विय सहाय्यक ज्ञानेश्‍वर कांदे यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता जे. के. भामरे यांच्यासह नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. विजेचे खांब तातडीने उभे करतानाच वीज वाहिन्या सुरळीत करुन पुरवठा सुरळीत करा, असे श्री. कांदे यांनी सांगितले.

Monsoon debris
वादळी पावसाच्या तडाख्याने 18 गावांत 504 शेतकऱ्यांचे नुकसान

या वेळी उपजिल्हाप्रमुख संग्राम बच्छाव, महेंद्र दुकळे, युवासेना उपजिल्हाप्रमुख सुरेश शेलार, तालुका प्रमुख पंकज निकम, वैभव साळूखे, मुन्ना पवार, यशवंत देसले, रोहित जाधव, सायबु नरवाडे, विजय इप्पर, दिनकर महाले, संजय उगले, राहुल सरावत, प्रदीप देसले, सोनू पाटील आदींसह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. शहरातही पावसामुळे अनेकांची धांदल उडाली. प्रथमच जोरदार सरी कोसळल्याने गच्चीवरील वाळवन, कपडे, अंथरुन व अन्नधान्य आवरताना शहरवासियांचीही तारांबळ झाली. पावसाबरोबरच वाऱ्याचा जोरही मोठा होता. शहरातील बहुसंख्य भागातील पुरवठा रात्री आठपर्यंत सुरळीत झालेला नव्हता.

वीजपुरवठा खंडीत झाल्याने संताप

शहर व परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे द्यानेसह विविध भागात वीज खांब कोसळले. वीज वाहिन्यांवर वृक्ष उन्मळून पडल्याने शहरातील वीज पुरवठा खंडीत झाला होता. पुरवठा सुरळीत करताना खासगी कंपनी एमपीएसएल च्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नाकीनऊ आले होते. वीज पुरवठा खंडीत असल्याने शहरातील व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत न झाल्याने नागरीक एमपीएसएलला शिव्यांची लाखोळी वाहत होते. त्यातच वीज कंपनीचे चौकशी दुरध्वनीही बंद असल्याने व प्रतिसाद मिळत नसल्याने नागरिकांच्या संतापात भर पडली होती.

Monsoon debris
तिच तेराव अन् निकालाचा दिवस एकच; मृत साक्षीला बारावीत 56 टक्के

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com