Summer Temperature : उष्णतेच्या उच्चांकाने जनजीवन ठप्प! मुंबई- आग्रा महामार्गावरील वाहतूकही मंदावली

The traffic on the busy highway has also slowed down due to the hot summer
The traffic on the busy highway has also slowed down due to the hot summeresakal

Summer Temperature : तालुक्यात हंगामातील उष्णतेचा उच्चांक गाठल्यानंतर मागील आठवडाभरापासून तापमानाच्या शृंखलेत काहीसे चढउतार होत असले तरी टळटळीत उन्हामुळे जनजीवनावर विपरीत परिणाम झाला आहे.

यास्थितीत शहरात व तालुक्यात सातत्याने अघोषित भारनियमनाचे चटके बसत आहे. यामुळे वाढत्या उकाड्याला तोंड देताना नागरिकांच्या नाकीनऊ आले आहे.

दरवर्षी सर्वसाधारणपणे मेच्या उत्तरार्धात ढगाळ वातवरण होऊन तापमान कमी होण्यास सुरवात होते, मात्र तशी चिन्हे अद्याप दिसत नाही. (high heat summer temperature rising Traffic on Mumbai Agra highway affected nashik news)

थंड हवेसाठी प्रसिद्ध इगतपुरीमध्ये मे महिन्यात उन्हाची दाहकता अधिकच वाढली आहे. एप्रिलमध्ये ४० अंशांच्या आसपास राहिलेल्या तापमानाने मे महिन्यात ४१ ते ४२ अंशापर्यंत पोचले आहे. पुढील काळात तो अधिक उंचावण्याची धास्ती मात्र कायम आहे.

मागील आठवडाभरापासून वर चढलेला पारा सतत वरच चढता राहिला आहे. त्यामुळे तीव्र उष्णता,उकाडा व अंगाची काहिली कायम राहिल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
सकाळच्या प्रहरातच आठ-नऊ वाजल्यापासून उन्हाचे चटके बसायला सुरवात होते.

ती पार सूर्यास्तापर्यंत कायम राहते. यामुळे उन्हाच्या तडाख्याने बहुतांश नागरिक दुपारी घराबाहेर जाणे टाळत आहेत. या काळात प्रमुख बाजारपेठा, रस्त्यांवर वर्दळ कमी झाल्याचे दिसून येते. प्रमुख बाजारपेठांमधील व्यवहार थंडावलेले आहेत. शासकीय कार्यालयांतील वर्दळही कमी झालेली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

The traffic on the busy highway has also slowed down due to the hot summer
हाय गर्मी! घर थंड ठेवण्यासाठी ‘हे’ करा, सोपे आणि स्वस्त उपाय! Summer

भारनियमनाचे चटके सुरू

शहरासह ग्रामीण भागात कोणत्याही वेळी वीजपुरवठा खंडित होत असतो. सायंकाळी गर्दीच्या वेळी वीजपुरवठा खंडित होत असल्याने व्यापारीवर्गात नाराजी आहे. विचारणा झाल्यास महावितरण स्थानिक बिघाडाचे कारण पुढे करते.

एखाद्या भागात अर्धा तास वीज गेली असल्यास ‘फ्यूज’ उडणे वा तत्सम बिघाड असू शकतो असे सांगितले जाते. शहरात वीजपुरवठा खंडित होण्यामागे तांत्रिक समस्या हेच मुख्य कारण असल्याचे महावितरणचे म्हणणे आहे.

ग्रामीण भागात गळती-उत्पन्नाच्या निकषावर काही भागांत भारनियमन सुरू आहे.

The traffic on the busy highway has also slowed down due to the hot summer
India Summer Heat : भारतातील साठ कोटी लोकांना उष्णतेचा धोका; अन्य देशांतील स्थिती चिंताजनकच

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com