इगतपुरी- तालुक्यात आठ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधारेमुळे वैतरणा, भाम, दारणा, भावली ही चार धरणे पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाली आहेत. सोमवारी (ता. ७) सकाळी मुंबईला पाणीपुरवठा करणारे महत्त्वाचे वैतरणा धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, पाणी ओसंडून वाहू लागले.