Water Crisis: उन्हाची तीव्रता वाढल्याने जिल्ह्यात टॅंकरच्या मागणीत वाढ! लाखाहून अधिक जनता अवलंबून | Increased demand for tankers in district due to increase in summer intensity More than lakhs of people depend nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Water Supply Through Tankers

Water Crisis: उन्हाची तीव्रता वाढल्याने जिल्ह्यात टॅंकरच्या मागणीत वाढ! लाखाहून अधिक जनता अवलंबून

Water Crisis : शहर व जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढत असताना पाण्याची मागणीही वाढू लागली आहे. जिल्ह्यात सद्यःस्थितीत एक लाखाहून अधिक लोकसंख्येला टॅकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

साधारणतः सव्वाशेहून अधिक टँकर सुरू आहेत. (Increased demand for tankers in district due to increase in summer intensity More than lakhs of people depend nashik news)

जिल्ह्यात येवला, मालेगाव, बागलाण, चांदवड, इगतपुरी, पेठ आणि सुरगाणा तालुक्यांत टँकरची मागणी वाढत आहे. पावसाच्या पश्चिम पट्ट्यातील त्र्यंबकेश्वर आणि कळवण वगळता इगतपुरी, पेठ, सुरगाणा या पावसाळी तालुक्यांत टँकरची मागणी वाढत आहे.

कमी पावसाच्या दुष्काळी तालुक्यात, तर टंचाईचे चित्र अधिकच तीव्र आहे. त्यात, येवला, मालेगाव, चांदवड तालुक्यांत संख्या वाढत आहे. बागलाण तालुक्यातील आठ गावांत अकरा टँकर सध्या सुरू आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

चांदवडला सात गावांत १४ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. इगतपुरीत १९ गावांना १३ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पेठ आणि सुरगाणा तालुक्यांत सात आणि आठ गावांत प्रत्येकी दहा टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

मालेगाव तालुक्यात १५ गावांत १६ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. सर्वाधिक दुर्भिक्ष्य येवला तालुक्यात आहे. २८ गावे आणि १५ वाड्यांसह ५३ ठिकाणांवरील सुमारे ४३ हजारांवर लोकसंख्येला ५० टँकरने सध्या पाणीपुरवठा सुरू आहे. जिल्ह्यातील निम्मी तहानलेली लोकसंख्या येवला तालुक्यातील आहे.