Agriculture
sakal
लासलगाव: भारत- अमेरिका व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर देशातील शेतकरी हिताला प्राधान्य दिले जाणार का, असा प्रश्न परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. केंद्र सरकार परराष्ट्र धोरणाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय करार करत असताना स्थानिक शेतकऱ्यांच्या अडचणींकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. या करारामुळे भारतीय शेतीउद्योगाला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे, त्यामुळे सरकारने याप्रश्नी खुली चर्चा घडवून आणावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.