नाशिक रोड: २१ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत नवरात्र, दसरा व दिवाळी या प्रमुख सणांचा हंगाम सुरू होत आहे. या दरम्यान प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. वाढत्या मागणीचा विचार करून भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी हजारो विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.