Girna Dam water storage after Nashik rain
esakal
जळगाव : नाशिकसह गिरणा प्रकल्प पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे ‘गिरणा’च्या जलसाठ्यात वाढ झाली आहे. यामुळे २२ टक्के पाणीसाठा असलेल्या गिरणा प्रकल्पाच्या पातळीत १.०८ टक्के वाढ होऊन जलसाठा २३ टक्क्यांपर्यंत पोहोचला (Jalgaon rain latest news) आहे. दुसरीकडे हतनूर प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या दमदार पावसामुळे प्रकल्पाचे २२ दरवाजे उघडून सुमारे ५० हजार क्यूसेकचा विसर्ग केला गेला. मात्र असे असले तरी जळगाव जिल्ह्यात अजून दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.