Agriculture News : अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते! खेडलेझुंगेमध्ये सोयाबीन, मका पिके पाण्याखाली

Impact of Heavy Rain on Kharif Crops : नाशिकजवळील खेडलेझुंगे परिसरात झालेल्या सततच्या पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचले आहे. यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, मका, मूग यांसारखी पिके खराब झाली असून, शेतकरी हतबल झाले आहेत.
Kharif Crops

Kharif Crops

sakal 

Updated on

खेडलेझुंगे: गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. खरीप हंगामातील सोयाबीन, मका, मूग आणि उडीद यांसारख्या पिकांना पावसाचा प्रचंड फटका बसला आहे. शेतात पाणी साचून पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. जमिनीतील पोषक घटक वाहून गेल्याने पिकांची वाढ खुंटली असून, ती पिवळी पडू लागली आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com