kharif crop loss
sakal
येवला: खरीप हंगामात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याने सरकारने पॅकेज जाहीर करून मदतही दिली आहे. त्याच वेळी मुख्यमंत्र्यांनी नुकसानभरपाई पॅकेजमध्ये हेक्टरी १७ हजार रुपये पीकविम्याची घोषणा केली आहे. मात्र १०० टक्के नुकसान होऊनही हेक्टरी १७ हजारच मिळणार असतील तर ही शेतकऱ्याची फसवणूक झाल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. ही रक्कमदेखील शेतकऱ्यांच्या खात्यात केव्हा जमा होणार का, हा सवाल आता शेतकऱ्यांना पडला आहे.