Crime
sakal
नाशिक: बहीण आणि मेहुण्यात होणारे भांडण भाऊ या नात्याने सोडवत असल्याने त्याचा राग मेहुण्याच्या मनात होता. याच रागातून त्याने शालकाचे अपहरण केले आणि थेट परतूर (जि. जालना) गाठले. शालकाला कोंडून बेदम मारहाण करण्यात आली होती. अंबड पोलिसांनी परतूर गाठून युवकाची सुटका केली असून, संशयित मेहुण्याला अटक केली आहे. त्याचा संशयित मित्र फरारी झाला. या प्रकरणी अंबड पोलिसांत अपहरणासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.