नाशिक- राज्य शासनाच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या भूसंपादन मोबदल्याच्या नियमात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता व्याजदराचा मोबदला १५ ऐवजी नऊ टक्क्यांनी मिळणार असल्याने त्याचा परिणाम सिंहस्थासाठी यापूर्वी जागा दिलेल्या शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.