Education
sakal
नामपूर: केंद्र सरकारच्या नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षणात महत्त्वपूर्ण बदल करण्यात येणार असून, दुसरी, तिसरी, चौथी तसेच सहावीचा अभ्यासक्रम बदलला जाणार आहे. नव्या बदलात पारंपरिक पाठांतर पद्धतीऐवजी कृती आधारित, अनुभवाधिष्ठित आणि कौशल्यविकासावर आधारित शिक्षणावर भर दिला जाणार आहे.