Sanjay Shirsat
sakal
येवला: माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने पूर्ण महाराष्ट्राला नाही, तर देशभरातील त्यांच्या चाहत्यांना दुःख झाले आहे. त्यांच्या अपघाताबाबत अनेक शंका अनेक लोकांनी उपस्थित केल्या. त्या शंकांचं निरसन झालं पाहिजे. सरकार प्रयत्न करत आहे. पण रोज नवीन पुरावे येत असतील, तर दखल घेतली पाहिजे. रोहित पवारांची मांडणी व आरोप केले, त्याची त्यात शंका घेण्याचे कारण आहे. त्याची सीबीआय किवा इतर संस्थेमार्फत उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, असे प्रतिपादन सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांनी सांगितले.