RTE admission
sakal
सटाणा: शिक्षणाचा हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत खासगी विनाअनुदानित शाळांमधील २५ टक्के राखीव प्रवेशप्रक्रियेत राज्य शासनाने महत्त्वपूर्ण बदल करत पालकांना मोठा दिलासा दिला आहे. शाळा निवडीसाठी लागू असलेली एक किलोमीटरची सक्ती शिथिल करण्यात आली असून, आता पालकांना तीन व पाच किलोमीटरपर्यंतच्या शाळा निवडण्याची मुभा मिळणार आहे. तसेच ऑनलाइन अर्ज प्रक्रियेसाठी २५ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.