

North Maharashtra Set for Irrigation Transformation with Nar-Par-Girna Project Launch
sakal
नाशिक : अनेक दशकांपासून दुष्काळ, अनियमित पाऊस आणि पाणीटंचाईच्या संकटाचा सामना करणाऱ्या उत्तर महाराष्ट्रासाठी नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्प आशेचा नवा किरण ठरणार आहे. तब्बल ४ हजार ११६ कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामासाठी राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने वर्क ऑर्डर जारी करत प्रत्यक्ष अंमलबजावणीचा मार्ग मोकळा केला आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्राच्या जलसुरक्षेला मोठी चालना मिळणार असल्याचे मानले जात आहे.