Shobha Bachhav
sakal
नाशिक: मनमाड- इंदूर रेल्वेमार्गासह धुळ्याहून मुंबई व पुणे येथे तातडीने रेल्वे सुरू करावी, अशी आग्रही मागणी धुळ्याच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी आज संसदेत केली. उत्तर महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणारा मनमाड- इंदूर रेल्वे प्रकल्प, तसेच धुळे जिल्ह्यातील विविध प्रलंबित रेल्वे प्रश्न त्यांनी संसदेत उपस्थित करताना चार ते पाच दशकांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकल्पांची गरज प्रतिपादन केली.