नाशिक: मुंबई येथे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनामध्ये मोर्चाबाहेरील व्यक्तींनी घुसखोरी करत हे आंदोलन विस्कळित आणि बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या सर्व प्रकाराची चौकशी करत आवश्यक कारवाई करावी, अशी मागणी नाशिक जिल्हा सकल मराठा समाजाने केली आहे. याबाबत मंगळवारी (ता. २) जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्यामार्फत राज्यपालांना निवेदन सादर करण्यात आले.