नाशिक / वणी : माहेरच्या लोकांनी लग्नात चांगला मानपान दिला नाही, मुलगा झाला नाही या कारणावरुन सासरच्यांकडून वारंवार शारिरीक व मानसिक छळ व्हायचा विवाहितेचा...ती निमुटपणे सहन करत होती..पण एके दिवशी असह्य झाले...आणि मग...
असा घडला प्रकार...
मुलगी सोनालीचा विवाह मे २०१५ रोजी झाला होता. तेव्हापासून सोनालीचा सासरा हिरामन किसन सोनवणे, सासु सुशिलाबाई हिरामन सोनवणे, भाया संतोष हिरामन सोनवणे, जाऊ योगिता संतोष सोनवणे अशांनी तिस वारंवार क्षुल्लक कारणावरुन कुरापत काढुन तसेच तिचे अंगावर अधिकचे काम टाकुन तिला स्वयंपाक येत नाही, तिची संस्कृती नाही, तिचे माहेरचे लोकांनी लग्नात चांगला मानपान दिला नाही, मुलगा झाला नाही या कारणावरुन तिचा वारंवार शारिरीक व मानसिक छळ करुन तिला जीवन जगणे असह्य केले होते. यातूनच सोनालीने विहीरीत उडी मारुन आत्महत्या केली असल्याची फिर्याद दिली आहे. याबाबत वणी पोलिसांत सोनालीचे सासु, सासरे, दिर व जाऊ या चौघांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर शिंपी, पोलिस हवालदार साहेबराव वडजे, किरण धुळे करीत आहे. सोनालीच साडेचार वर्षाची मुलगी आहे.
चौघा विरुध्द गुन्हा दाखल
माहेरच्या लोकांनी लग्नात चांगला मानपान दिला नाही, मुलगा झाला नाही या कारणावरुन वारंवार शारिरीक व मानसिक छळाला कंटाळून मुलीने विहीरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची फिर्याद पोलिसांत दिल्याने चौघा विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मातेरेवाडी, ता. दिंडोरी येथील सोनाली गणेश सोनवणे, (वय २८) रा. मातेरेवाडी हीचा मातेरवाडी शिवारातील शेतातील विहीरीत बुधवारी,(ता. १) रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास विहीरीत पडून मृत्यु झाला होता. याबाबत वणी पोलिसांत अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली होती. दरम्यान मुलीचे वडील नामदेव बाबुराव मोरे, (वय 57) वर्षे, रा. जालखेड, ता. दिंडोरी यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.