Namokar Teerth
sakal
नाशिक/गणूर: सध्या आपण कोणतीही गोष्ट ‘जीडीपी’मध्ये मोजतो म्हणून सांगावेसे वाटते, की देशाच्या आर्थिक विकासात जैन समाजाचा वाटा मोठा आहे. देशाच्या एकूण विकासातही जैन समाजाचे मोठे योगदान आहे. केवळ सर्वांत जास्त सेवाकार्यच नाही, तर दानधर्म करण्यातही जैन बांधव नेहमीच पुढे राहतात. त्यांनी अंगीकारलेले धर्माचे विचारच देशाला दिशा दाखवू शकतात. णमोकार ही भूमी केवळ धार्मिक स्थळ नसून, येणाऱ्या अनेक शतकांना योग्य मार्ग दाखविणारी आध्यात्मिक भूमी ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.