Narhari Zirwal : 16 आमदारांबाबत निर्णय अद्याप बाकी, सरकार स्थिर कसे : झिरवाळ

Narhari Zirwal
Narhari Zirwalesakal

Narhari Zirwal : सर्वोच्च न्यायालयाने सोळा आमदारांच्या निलंबनाचे अधिकार विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत. अपात्रतेचा निर्णय बाकी आहे, ते १६ आमदार अपात्र झाले तर सरकार कसे स्थिर राहील? असा प्रश्‍न विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी करताना शिंदे व फडणीस सरकारवर टांगती तलवार असल्याचा दावा केला.

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील पक्षांना विश्वासात घेऊन राजीनामा दिला असता तर आजचे चित्र वेगळे असते असा दावा देखील त्यांनी केला. (Narhari Zirwal statement Decision on 16 MLAs still pending how government stable maharashtra politics nashik news)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Narhari Zirwal
Narhari Zirwal: सुप्रीम कोर्टाचा निकाल तो लागेल, नरहरी झिरवळांनी घेतला मिसळीचा आस्वाद

श्री. झिरवाळ म्हणाले की, तूर्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार बचावले असते तरी सोळा आमदारांच्या अपात्रते संदर्भातील निर्णय अद्याप बाकी आहे. ते सोळा आमदार अपात्र झाल्यास सरकार स्थिर राहणार नाही.

भरत गोगावले यांची नियुक्ती न्यायालयाने बेकायदेशीर ठरविताना अपात्रतेचे प्रकरण सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे जाण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर सरकार वाचलं असते. आता सोळा आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय झाल्याशिवाय प्रक्रिया होणार नाही असे श्री. झिरवाळ म्हणाले.

Narhari Zirwal
Shiv Sena Political Crisis : उद्धव ठाकरेंनी पृथ्वीराज चव्हाणांचं ऐकलं असतं तर, निकाल वेगळा लागला असता!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com