
पंचवटी : महापालिकेने व्यावसायिकांसाठी पालिका बाजार व संकुलांची निर्मिती केली आहे. मात्र, पंचवटीतील पालिका बाजार व गाळे संकुलाला प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. अनेक गाळे संकुल वापराविना धूळखात पडून आहेत. काही ठिकाणी अडगळ म्हणून वापर केला जात आहे. काही संकुलाची दुरवस्था झाली असून अस्वच्छतेचे साम्राज्य चित्र दिसून येत आहे. नारोशंकर मंदिराच्या समोरच्या बाजूला सुमारे वीस वर्षांपूर्वी उभारलेले गाळे संकुलात टपाल कार्यालय वगळता इतर सर्व गाळे पडून आहेत.