

Supriya Sule on Devendra Fadnavis : राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्याची प्रमुख जबाबदारी सत्ताधारी पक्षांची असताना सरकारमधील नेतेच प्रक्षोभक भाषणे करून दंगलींना प्रोत्साहन देत आहेत. यात राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही समावेश असून, त्यांच्या आशीर्वादामुळेच नाशिकसह जळगाव, धुळ्यात दंगली झाल्या, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रविवारी (ता. १९) येथे केला. (Sule targets Fadnavis regarding riots in old nashik)