येवला: जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांनी कात टाकली आहे. गावोगावी अतिशय सुंदर व देखण्या शाळा आणि वर्गखोल्या उभारून खासगी शाळांनाही मागे टाकत असताना दुसरीकडे काही ठिकाणी धोकादायक वर्गखोल्यांमुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून ज्ञानार्जन करावे लागत आहे. जिल्ह्यात तब्बल ८०० वर वर्गखोल्या धोकादायक असल्याने त्याची दुरुस्ती होण्याची गरज आहे.