सातपूर- गेल्या तीन वर्षात नाशिक जिल्ह्याच्या औद्योगिक क्षेत्रात विविध उद्योगात आगीच्या सुमारे २४ दुर्घटना घडल्या आहेत. या बाबत औद्योगिक सुरक्षा विभागामार्फत घटनांची चौकशी केली जाते, अहवाल तयार करून वरिष्ठांना पाठवले जातात पण त्यानंतर संबंधितांवर कारवाई केली जात नसल्यामुळेच अनेक उद्योजक निर्ढावल्याचे पाहायला मिळाले आहे. कामगार कायदे व औद्योगिक सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवले जात असल्यामुळे कंपन्यांमध्ये होणाऱ्या दुर्घटनेत कामगारांचा नाहक बळी जात असल्याची भावना कामगार संघटनांनी व्यक्त केली आहे.