नाशिक: समृद्धी महामार्गासह प्रस्तावित ड्रायपोर्ट, आयटी पार्क, वाढते औद्योगीकरण, लॉजिस्टीक पार्क, ओझर विमानतळाचा विस्तार व आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याचा विचार करून नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एनएमआरडीए) शहराला जोडणाऱ्या पोच रस्त्यांची किमान रुंदी पंधरा मीटर अनिवार्य केली आहे. भौगोलिक अडथळे असलेल्या रस्त्यांची रुंदी बारा मीटर करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात निवेदन जाहीर केले आहे.