Kunj Gupta
sakal
पिंपळगाव बसवंत: पिंपळगाव बसवंत शहरात भटक्या कुत्र्यांनी थैमान घातले असून, महिन्याभरात तब्बल दीडशे पिंपळगावकरांना चावा घेतला आहे. कुत्र्यांच्या हल्ल्यात मंगळवारी (ता. ९) चारवर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कुत्र्यांच्या दहशतीने पिंपळगावकर भयभीत झाले असून, त्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.