Pitru Paksha
sakal
नाशिक: लाडक्या गणरायाला शनिवारी (ता. ६) भक्तिभावात निरोप देण्यात आल्यावर सोमवार (ता. ८) पासून पितरांच्या स्मृती जागविणाऱ्या पंधरवड्यास प्रारंभ होत आहे. वृक्षवल्ली कमी झाल्याने अलीकडे शहराच्या गावठाण भागात ‘काकस्पर्श’ दुर्मिळ झाला आहे. त्यामुळे तपोवन रोडवरील स्मृतिवन उद्यानालगतच्या भिंतीवर पितरांना ‘घास’ देण्यासाठी पुढील पंधरा दिवस मोठी गर्दी उसळण्याची शक्यता आहे. दरम्यान भोजनासाठी लागणारी केळीची पाने घेऊन शेकडो आदिवासी बांधव शहरात दाखल झाले आहेत.