Bachchu Kadu
Sakal
तळवाडे दिगर: आपण शेतकरी म्हणून एकत्र येत नाही, हाच सर्वांत मोठा शोक आहे. नेतेमंडळी किंवा राजकीय पदाधिकारी विविध ठिकाणी एकत्र येतात; पण शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी कोणी एकत्र येत नाही. जाती-धर्माच्या नावाने आपण एकमेकांशी भिडत आहोत, सरकारशी लढत नाही, अशी टीका बच्चू कडू यांनी केली.