Rabi Crop Insurance
sakal
तळवाडे दिगर: प्रधानमंत्री पीकविमा योजनेत रब्बी हंगामात पीकविमा योजनेकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे समोर आले आहे. यंदा २०२५-२६ रब्बी हंगामासाठी जिल्ह्यातील १४ तालुक्यांतून जेमतेम ५० हजार ७८८ शेतकऱ्यांनी पीकविमा संरक्षित केला असून, गेल्या वर्षी रब्बी हंगामात जिल्ह्यातून चार लाख ३६ हजार ५३१ शेतकऱ्यांनी विमा उतरविला होता. गतवर्षीच्या तुलनेत तीन लाख ७६ हजार ७४३ शेतकऱ्यांनी रब्बी पीकविम्याकडे पाठ फिरवली आहे.