Monsoon
sakal
येवला: पावसाळा संपण्याच्या उंबरठ्यावर असून, आता परतीचा पाऊस शिल्लक आहे. असे असताना या वर्षी जिल्ह्यातील अद्याप ८५ महसूल मंडल सरासरीपासून दूर आहेत. अवघ्या ३५ मंडलांनीच सरासरीचे शतक गाठले आहे. पुढील रब्बी व उन्हाळी हंगामाच्या दृष्टीने पावसाने सरासरी तरी गाठावी ही अपेक्षा लागून आहे. दरम्यान, १५ तालुक्यांपैकी अवघ्या दिंडोरी तालुक्यानेच सरासरी गाठली आहे. उर्वरित सर्वच तालुके ६० ते ८० टक्क्यांत अडकून आहेत.