Nashik Water Crisis: नाशिककरांच्या पाणी संकटात कपात; गंगापूर धरणात 82 टक्के पाणी ठेवणे शक्य

Gangapur Dam File Photo
Gangapur Dam File Photoesakal

Nashik Water Crisis : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणामध्ये वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा असला तरी मराठवाड्यातील जायकवाडी धरणांमधून कालव्यांना पाणी सोडण्यात आल्याने तेथील पाणीसाठा ३७ टक्क्याच्या खाली आला होता.

मात्र आता मागील दोन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे जायकवाडीचा जलसाठा ३८ टक्क्यांच्या वर गेल्याने मेंढीगिरी समितीच्या शिफारशीनुसार गंगापूर धरणात ६१ टक्के ऐवजी ८२ टक्क्यांपर्यंत पाणीसाठा ठेवणे शक्य होणार आहे. (Reduction in water crisis of Nashikkars possible to store 82 percent water in Gangapur Dam nashik)

नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर, मुकणे व दारणा या तीन धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा आहे. परंतु मराठवाड्याला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणात अवघा ३७ टक्के पाणीपुरवठा काही दिवसांपूर्वी होता.

मराठवाड्यातील कालव्यांना पाणी सोडल्यानंतर जायकवाडीच्या पाण्याची टक्केवारी कमी झाली ३५ टक्क्यांपर्यंत पाणीसाठा निर्माण झाला होता.

राज्य शासनाने नियुक्त केलेल्या मेंढीगिरी समितीने पाणी वाटप संदर्भात सूत्र आखून दिले आहे. त्या सूत्रानुसार जायकवाडी धरणामध्ये ३७ टकके पाणीसाठा असल्यास मुळा धरण समूहात ४९ टक्के, प्रवरा ५५ टक्के, दारणा धरण समूहात ५४ टक्के, पालखेड धरणात ७३ टक्के तर गंगापूर धरणात ६१ टक्के पाणीसाठा ठेवावा.

तर जायकवाडी धरणात ५४ टक्के ते ६५ टक्के पाणीसाठा असेल तर मुळा धरण समूहात ६५ ते ७९ टक्के, प्रवरात ७९ ते ९३ टक्के, दारणा धरणात ८४ ते १०२ टक्के, पालखेड ७३ ते ८२ टक्के, गंगापूर धरण समूहात ७४ ते ८२ टक्के पाणी साठा ठेवावा. असे सूत्र निश्चित करण्यात आले आहे.

Gangapur Dam File Photo
Water Crisis: टंचाई मराठवाड्यात धडकी मात्र नाशिकमध्ये! कालव्यांना पाणी सोडल्याने 37 टक्क्यांच्या खाली पाणीसाठा

जायकवाडी धरणामध्ये उपलब्ध असलेल्या पाण्याची टक्केवारी घटत असल्याने नाशिकच्या गंगापूर धरणा मधून जवळपास ३९ टक्के पाणी सोडण्याची वेळ येणार होती. यामुळे नाशिककरांचे देखील टेन्शन वाढले.

मात्र मागील दोन दिवसांपासून गंगापूर धरण समूहाच्या क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस होत आहे. धरणाच्या खालील क्षेत्रात देखील मुसळधार पावसामुळे नांदूर मध्यमेश्वर मार्गे जायकवाडीकडे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाल्या परिणामी आजचे स्थितीमध्ये जायकवाडी धरणामध्ये ३८ टक्के पाणीसाठा निर्माण झाला आहे.

त्यामुळे नाशिककरांवरील पाणी संकटात देखील कपात झाली आहे. मेंढी गिरी समितीच्या अहवालानुसार गंगापूर धरणात ७४ ते ८२ टक्के पाणीसाठा ठेवणे आता शक्य होणार आहे.

अतिरिक्त पाणी नोंदणीची दखल

२५ सप्टेंबर पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धरणातील पाणी साठ्याचा आढावा घेऊन पाण्याची मागणी नोंदविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

गंगापूर धरणातून ४ हजार ४००, दारणा धरणातून शंभर तर मुकणे धरणातून १ हजार ७०० दशलक्ष घनफूट पाण्याची मागणी महापालिकेने नोंदविली आहे.

जायकवाडीतील पाण्याची टक्केवारी वाढल्याने नाशिक महापालिकेने नोंदविलेली पाण्याची मागणी मान्य होण्याची शक्यता बळावली आहे.

Gangapur Dam File Photo
Water Crisis: अपुऱ्या पावसामुळे लोकप्रतिनिधींची कसोटी! निवडणुकीच्या तोंडावर पाणीटंचाई गाजणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com