नाशिक- जिल्हाधिकारी कार्यालयामधील हेरिटेज वास्तूवरील जुनाट कौले बदलून त्याठिकाणी नवीन कौले बसविण्याचे काम प्रगतिपथावर आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात मुख्य इमारतीची होणारी पाणीगळती थांबणार आहे. .ब्रिटिशकालीन जिल्हाधिकारी कार्यालयातून पंधरा तालुक्यांचा कारभार सांभाळला जातो. साधारणतः सव्वाशे वर्षांहून अधिक जुन्या असलेल्या या वास्तूला हेरिटेज दर्जा आहे. मात्र, इमारतीवरील कौले जुनी झाल्याने दर वर्षी पावसाळ्यात इमारतीला ठिकठिकाणी गळती लागते. काही अधिकाऱ्यांच्या दालनात देखील गळती होत असून, काही विभागांत पावसाच्या पाण्यामुळे कागदपत्रे ओली होण्याचे प्रकारदेखील यापूर्वी घडले आहेत. त्यामुळेच ही गळती रोखण्यासाठी दर वर्षी एप्रिल-मेमध्ये संपूर्ण इमारतीवर प्लॅस्टिक कागद टाकला जातो. मात्र, या कागदामुळे मुख्य वास्तूच्या सौंदर्याला बाधा निर्माण होते. पण, इमारतीलाही धोका पोहचण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच वर्षाकाठी प्लास्टीकवरही हजारो रुपयांचा खर्च होत होता. .अखेर जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली इमारतीवरील कौले बदलण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कौले बदलण्यात येत आहे. सदरची वास्तू ही हेरिटेज सल्याने इमारतीच्या मुख्य भागाला कोठेही धक्का न लावता हे काम केले जात आहे. पुढील पंधरात दिवसात टप्याटप्याने हे काम पूर्ण होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे..‘नियोजन’मधून खर्चजिल्हा वार्षिक योजनेमध्ये पाच टक्के निधी हा विविध शासकीय कार्यालयांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी राखीव असतो. याच निधीमधून जिल्हा मुख्यालयाच्या इमारतींवरील कौले बदलण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच वास्तूला नवी झळाळी मिळणार आहे. दरम्यान, यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयातील यूएलसी विभागाचे नूतनीकरण करण्यात आले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
नाशिक- जिल्हाधिकारी कार्यालयामधील हेरिटेज वास्तूवरील जुनाट कौले बदलून त्याठिकाणी नवीन कौले बसविण्याचे काम प्रगतिपथावर आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात मुख्य इमारतीची होणारी पाणीगळती थांबणार आहे. .ब्रिटिशकालीन जिल्हाधिकारी कार्यालयातून पंधरा तालुक्यांचा कारभार सांभाळला जातो. साधारणतः सव्वाशे वर्षांहून अधिक जुन्या असलेल्या या वास्तूला हेरिटेज दर्जा आहे. मात्र, इमारतीवरील कौले जुनी झाल्याने दर वर्षी पावसाळ्यात इमारतीला ठिकठिकाणी गळती लागते. काही अधिकाऱ्यांच्या दालनात देखील गळती होत असून, काही विभागांत पावसाच्या पाण्यामुळे कागदपत्रे ओली होण्याचे प्रकारदेखील यापूर्वी घडले आहेत. त्यामुळेच ही गळती रोखण्यासाठी दर वर्षी एप्रिल-मेमध्ये संपूर्ण इमारतीवर प्लॅस्टिक कागद टाकला जातो. मात्र, या कागदामुळे मुख्य वास्तूच्या सौंदर्याला बाधा निर्माण होते. पण, इमारतीलाही धोका पोहचण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच वर्षाकाठी प्लास्टीकवरही हजारो रुपयांचा खर्च होत होता. .अखेर जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली इमारतीवरील कौले बदलण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कौले बदलण्यात येत आहे. सदरची वास्तू ही हेरिटेज सल्याने इमारतीच्या मुख्य भागाला कोठेही धक्का न लावता हे काम केले जात आहे. पुढील पंधरात दिवसात टप्याटप्याने हे काम पूर्ण होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे..‘नियोजन’मधून खर्चजिल्हा वार्षिक योजनेमध्ये पाच टक्के निधी हा विविध शासकीय कार्यालयांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी राखीव असतो. याच निधीमधून जिल्हा मुख्यालयाच्या इमारतींवरील कौले बदलण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच वास्तूला नवी झळाळी मिळणार आहे. दरम्यान, यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयातील यूएलसी विभागाचे नूतनीकरण करण्यात आले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.